स्पेक्ट्रम घोटाळ्यात एकमेकांवर नावे घेऊन चिखलफेक करण्यासाठी राजकारणी धावत आहेत. पण कोणीही पत्रकार किंवा वृत्तपत्रांच्या संस्थांची नावे घ्यायला तयार नाहीत. एक तर त्यांना त्यांचंच बरंच काही दडवायचं आहे. आणि मीडियावर हल्ला चढवणं कदाचित त्यांच्यावर उलटू शकतं. पण त्यापेक्षाही आणखी चिंतेची बाब आहे ती ही की मीडियातील भ्रष्ट व्यक्ती या बिग बॉसच्या चौथ्या सत्रातील डॉली बिंद्रासारख्या आहेत. तिच्यातील चांगल्या गोष्टी जाणून घेण्यासाठी थोडा वेळ आहे. तिच्या डोक्यात काय चालू आहे, हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला वेळ मिळतो आहे. पण तिच्यावर विश्वास ठेवावा की ठेवू नये हे ठरवायला तुम्हाला आणखी काही काळ विचार करायला लागतो आहे.
हे काही मीडियाचे समर्थन नाही. उलट हा लेख वाचताना तुम्हाला जाणवेल की त्याच्या विरोधातच आहे. सर्वात प्रथम मीडियाच्या संदर्भातील काही आरोप आणि प्रत्यारोप मला तुमच्यापुढे मांडू द्या. मीडिया किंग मेकर आहे. तोच एक भ्रष्टाचार आहे. समाजातील वास्तववादी परिणामापासून ते फार वेगळे आहे. आणि ते सनसनाटी निर्माण करणारे आहे. काही प्रमाणात हा मीडियावर त्यांनीच ओढवून घेतलेला आरोप आहे तर काही प्रमाणात हे वास्तव आहे. सर्वात प्रथम मीडिया हा भ्रष्ट आहे. त्याचे संबंध फार उच्च स्तरापर्यंत पोहोचले आहेत.
मीडियातील प्रत्यक्ष कामकाजाबद्दल फार कमी लोकांना माहीत आहे आणि ते जाणू शकतात. कोणत्याही वृत्तपत्राच्या संस्थेमध्ये बाहेरच्या जगाला माहीत असलेल्या ‘शक्तिशाली’ संपादकीय विभागात साधारणपणे पन्नास एक लोक काम करतात, ज्यातील निम्म्यापेक्षा फार कमी जण वार्ताहर असतात (खऱ्या अर्थाने श्रमिक पत्रकार) ज्यांचा बाहेरच्या जगाशी अधिक संपर्क असतो किंवा बाहेरच्या जगाला त्याबद्दल माहिती असते. त्या २० पत्रकारांपैकी फारतर चार किंवा पाच जण असे पत्रकार असतात, ज्यांचा उच्च स्तरापर्यंत किंवा खूप वपर्यंत संपर्क असतो. म्हणजे त्यांचा राजकारणातील प्रमुख लोकांपर्यंत (राजकीय बीट सांभाळणारे) आणि चित्रपट क्षेत्रातील मान्यवरांपर्यंत (जे बॉलिवूड किंवा हिंदी सिनेमा-अन्य भाषिक सिनेमा नाही-हे बीट सांभाळतात) यांच्याबाबत मी सांगत आहे. क्रीडा विभाग हा दुय्यम असतो आणि त्यातही केवळ क्रिकेट आणि त्यातही सचिन तेंडुलकरशिवाय अन्य काही नाही, हेच पत्रकार असे असते.
आता आपण संपादकीय विभागातील पन्नासपैकी केवळ पाच जणांबाबत बोलत आहोत, जे राजाच्या खांद्याला खांदा घासत असतात. ते १० टक्क्यांपेक्षा कमी आहेत. आणि त्यातही एखाद्या दुर्मिळ प्रसंगी एखादा पत्रकार आपल्या पदाचा गैरवापर करतो.
हे सर्व तो पत्रकार कोणत्या वृत्तपत्राशी संबंधित आहे, यावर अवलंबून असते. सत्तेच्या वर्तुळात ते वृत्तपत्र किती महत्त्वाचे आहे आणि तो पत्रकार तेथे कोणत्या पदावर आहे, यावरच सर्व अवलंबून असते. शेवटी अन्य वृत्तपत्रातील त्याचे प्रतिस्पर्धी सहकारी आणि त्याच बीटवर काम करणाऱ्या त्याच्या अन्य सहकाऱ्यांपेक्षा तो किती योग्य प्रकारे आपला निशाणा साधतो, हेच मुख्य पाहण्यासारखे आहे. म्हणजेच एकूण कामाच्या केवळ एक टक्का हा कदाचित भ्रष्ट असू शकतो. मग संपूर्ण मीडिया भ्रष्ट असल्याचा सामूहिक आरोप आला कुठून? हे सुरू झाले ते मीडियाने त्याच्या संबंधांचा गैरवापर करून शिधापत्रिका प्रक्रियेमध्ये हस्तक्षेप केला आणि प्रेस चे स्टिकर वापरून वाहतूक यंत्रणेतून झटपट स्वत:ची सोडवणूक करून घेतली तेव्हापासून. पण हा लेख तुम्हाला चित्रपटाची तिकीटे मिळवून देणाऱ्या किंवा मंत्र्याबरोबर तुमची भेट ठरवून देणाऱ्या ९५ टक्के पत्रकारांबाबत नाही. तर उरलेल्या पाच टक्के पत्रकारांबाबत आहे.वर्षांनुवर्षे आपण काम करतो त्या वृत्तपत्रापेक्षा स्वत:ला मोठे समजणारे हे पाच टक्के मंडळी आहेत. त्यांना असे वाटते की उच्चपदस्थ किंवा फार मोठय़ा पदावरच्या व्यक्ती आपल्याकडे तोंडावर ओशाळवाणे हसू घेऊन येतात ते आपल्या वृत्तपत्रामुळे किंवा आपल्या पदामुळे नाहीत तर आपल्यामुळेच आपल्याकडे येतात. आपल्याला कौटुंबिक स्नेहसंमेलनासाठी त्यांच्या घरी बोलावतात किंवा गणपतीमध्ये पत्रकाराच्या घरी जातात, ते केवळ आपल्यामुळेच! एखाद्या राजाने एखाद्याच्या घरी सणावाराला भेट दिली किंवा त्याच्या पहिल्या नावाने हाक मारली तर कोणाला आपण किंगमेकर झाल्यासारखे वाटणार नाही?वास्तवता लक्षात न घेता, तुम्हाला राजासोबत पाहिल्यावर तुमच्या समाजातील किंवा तुमच्या शेजाऱ्यांपैकी किमान अध्र्या लोकांना तुम्ही शक्तिशाली असल्याचे वाटेल आणि अध्र्या लोकांना तुम्ही भ्रष्ट असल्याचे जाणवेल.
खरं तर तुम्ही एका अत्यंत मोठय़ा भ्रमात असलेले गाढव आहात, जे असे समजतात की राजा (राजकारणी, चित्रपट अभिनेते किंवा गुन्हेगारी जगतातील सम्राट) हा तुमच्या लेखणी किंवा तुमच्या पदाला घाबरत नसून तो तुम्हाला घाबरतो. जशी डोक्यावरील केस, तोंडातील दात आणि हाताची नखे जोपर्यंत त्याच्या जागी असतात तोपर्यंतच त्याला किंमत असते; तशीच पत्रकाराची किंमत (ते कितीही चांगले बोलत असले तरी) तोपर्यंतच असते हे ते जाणत नाहीत. जेव्हा ती संपते तेव्हा तर अधिक नसते.
एक काळ असा होता की, जेव्हा पत्रकार त्याच्या प्रभावी लेखणीने ओळखला जायचा. ते जे लिहित त्याला ताकद होती. वास्तवावर आणि निर्भिडपणे त्यांचे लिखाण होते. खऱ्या सत्तेला त्याबाबत संपूर्ण आदर होता. आज सत्ता भ्रष्ट झाली आहे. संपूर्ण सत्ता (मी स्वत: किंग मेकर असल्याचे मानतो)ही पूर्णपणे भ्रष्ट झाली आहे. कदाचित खोटे वाटेल पण संपूर्णपणे भ्रष्ट असलेला पत्रकार हा शक्तिशाली झाला आहे, तो त्याच्या लेखनामुळे नाही तर तो कोणाबरोबर आहे त्यामुळे. तो जो लेख लिहितो त्याच्याबदल्यात त्याला काही तरी मिळते, अनेकदा पैसे तर काहीवेळा वस्तुच्या रुपात त्याला त्याची किंमत मिळत असते. यामुळे ही मंडळी खंडणीखोर किंवा अपहरणकर्त्यांपेक्षा वेगळी नाहीत. तुमचे प्रेम एकीकडे मिळवत असताना त्याची किंमत ते अपेक्षित करीत असतात. मग जेव्हा तुम्हीच त्यात अडकले आहात तेव्हा मीडियाच्या विरोधात बोलणाऱ्या लोकांना तुम्ही कसे अडवू शकणार? स्पेक्ट्रम घोटाळ्यात एकमेकांवर नावे घेऊन चिखलफेक करण्यासाठी राजकारणी धावत आहेत. पण कोणीही पत्रकार किंवा वृत्तपत्रांच्या संस्थांची नावे घ्यायला तयार नाहीत. एक तर त्यांना त्यांचंच बरच काही दडवायचं आहे. आणि मीडियावर हल्ला चढवण कदाचित त्यांच्यावर उलटू शकते. पण त्यापेक्षाही आणखी चिंतेची बाब आहे ती ही की मीडियातील भ्रष्ट व्यक्ती या बिग बॉसच्या चौथ्या सत्रातील डॉली बिंद्रासारख्या आहेत. तिच्यातील चांगल्या गोष्टी जाणून घेण्यासाठी थोडा वेळ आहे. तिच्या डोक्यात काय चालू आहे, हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला वेळ मिळतो आहे. पण तिच्यावर विश्वास ठेवावा की ठेवू नये हे ठरवायला तुम्हाला आणखी काही काळ विचार करायला लागतो आहे. त्यामुळे तुमच्यापैकी काहीजण तिच्या वागण्याचा निषेध करतील आणि तिच्याबद्दल कडवट होतील तर त्या घरातील बाकी सगळ्यापुढे एकच उपाय असेल म्हणजे तिच्यापासून हातभर अंतर राखून वागणे. मीडियातील डॉली बिंद्रापासून हात राखून वागणे हेच सगळ्यात उत्तम. मी जितक्या जवळ जातो आहे तितके मी त्यांच्या अधिक प्रेमात पडण्याची, त्यांच्या समर्थनात जाण्याची शक्यता आहे. पण गप्प राहणे हा बाकी काही उपाय नाही. गुन्हा करणाऱ्यापेक्षा गप्प बसून गुन्हा पाहणे हा देखील मोठा गुन्हा आहे. म्हणून सभ्यतेच्या बुरख्याआड राहून जे भ्रष्ट आहेत असे तुम्हाला वाटते त्यांच्या विरोधात आवाज उठविण्याची हीच वेळ आहे. बाकीच्यांसाठी नागरी पत्रकारिता किंवा सामाजिक मीडिया हा पर्याय आहे. अन्यथा तुम्ही किंवा माझ्यासारखे सर्वसामान्य, जे आदर्श घोटाळा किंवा कॉमनवेल्थ किंवा तत्सम घोटाळ्यात आवाज उठवू शकलो काय?
शिशिर जोशी
(लोकसत्ता)
रविवार, २८ नोव्हेंबर २०१०
अनुवाद - प्रसाद मोकाशी)
Monday, November 29, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment